काऱ्हाटी ग्रामपंचायत हद्दीत उघड्यावर टाकलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका होऊ शकतो : गणेश थोरात


बारामती : काऱ्हाटी गावातील काही लोकांनी कचऱ्याचे ढीग उघड्यावर टाकले आहेत.सदर कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे.सदर उघड्यावर साठवलेल्या कचऱ्यामुळे रोग पसरण्याची शक्यता आहे.याबाबत गणेश थोरात यांनी ग्रामपंचायत मध्ये तक्रार दिली असून तात्काळ कचऱ्याची विल्हेवाट लावावी.अन्यथा येत्या काळात ग्रामपंचायत समोर आंदोलन करणार असल्याचे यावेळी सांगितले.
आमची रस्त्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.जर आजपर्यंत आम्हाला रस्ता मिळत नसेल तर आमचा विकास झाला का? हा प्रश्न याठिकाणी निर्माण होतो.
पुढारी निवडणुकी पर्यंत नागरिकांना भेटतील नंतर नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतचे हेलपाटे मारावे लागतात.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page