बारामती : बारामती शहरात वाढलेले झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी नागरिक तक्रार करतात परंतु बारामती नगर परिषद उद्यान विभाग या तक्रारी कडे दुर्लक्ष करते.नागरिक उद्यान विभागाचे कर्मचारी यांना फोन करतात परंतु सदर कर्मचारी फोन उचलत नाही.शहरातील शासकीय जागेवरील झाडांची देखभाल/जतन करणे नगर पालिकेचे काम आहे.
झाडांच्या फांद्या तोडून रस्तावर टाकल्यामुळे अपघात होऊ शकतो.नागरिकांनी वारंवार सांगून देखील याकडे उद्यान विभाग दुर्लक्ष करीत आहे.
मुख्याधिकारी यांनी उद्यान विभागातील आधिकारी कर्मचारी कशा पद्धतीने काम करतात हे पाहणे गरजेचे आहे.जर अपघात झाला तर जबाबदार कोण?
-
बारामती नगर परिषदसमोर आंदोलन केल्यावरच कामे होणार का? -
ॲड.भार्गव पाटसकर यांच्या वाढदिवसानिमित्त मिठाई वाटप




